वसिष्ठांनी दोन अंगूले जाड व चार हात लांब असे प्रमाण दंडाचे दिले आहे तर मनूने खालीलप्रमाणे दंडाचे वर्णन केले आहे.<blockquote>'''ऋजवस्ते तु सर्वे स्युरव्रणा:सौम्पदर्शनाः॥ अनुवैगकरा नृणां स त्वचोडनाग्निदुषिताः॥'''</blockquote>वरील श्लोक हा ब्रह्मचाऱ्यानी धरावयाच्या दंडाबद्दल आहे. शस्त्र म्हणून जेव्हा दंड वापरू तेव्हा स्वरक्षण व शत्रूवर आघात असे सरळ तत्व लक्षात ठेवले पाहिजे. साधारणतः मस्तक, बगल, कानशिल, पोटरी, कमर अशा शरिराच्या अवयवांवर काठीचे प्रहार केले जातात.<blockquote>'''करेणादाय लगुडं दक्षिणाङ्गुलकं नवम्। उद्यम्य पातयेत् तेन नाशस्तंस्य रिपोर्दुदः।।'''</blockquote><blockquote>'''उभाभ्यामथ हस्ताभ्यां कुर्यात्तस्य निपातनम्। अक्लेशेन हि तत् कुर्वन वधे सिद्धिमवाप्तुयात्॥'''</blockquote>अर्थ- उजव्या हातात नवी दणकट काठी घेऊन तो वर उचलून शत्रूला मारावी म्हणजे त्याचा घात होतो. दोन्ही हातानी त्याला खाली पाडावे सहजतेने हे करणारा शत्रूचा वध करण्याच्या बाबतीत सिद्धी प्राप्त करून घेतो बहुकामी व सहज उपलब्ध होणारी असली तरी ती चालविण्याचा नियमित सराव होणे गरजेचे असते जेणेकरून योग्यवेळी तिचा उपयोग करता येऊ शकतो. | वसिष्ठांनी दोन अंगूले जाड व चार हात लांब असे प्रमाण दंडाचे दिले आहे तर मनूने खालीलप्रमाणे दंडाचे वर्णन केले आहे.<blockquote>'''ऋजवस्ते तु सर्वे स्युरव्रणा:सौम्पदर्शनाः॥ अनुवैगकरा नृणां स त्वचोडनाग्निदुषिताः॥'''</blockquote>वरील श्लोक हा ब्रह्मचाऱ्यानी धरावयाच्या दंडाबद्दल आहे. शस्त्र म्हणून जेव्हा दंड वापरू तेव्हा स्वरक्षण व शत्रूवर आघात असे सरळ तत्व लक्षात ठेवले पाहिजे. साधारणतः मस्तक, बगल, कानशिल, पोटरी, कमर अशा शरिराच्या अवयवांवर काठीचे प्रहार केले जातात.<blockquote>'''करेणादाय लगुडं दक्षिणाङ्गुलकं नवम्। उद्यम्य पातयेत् तेन नाशस्तंस्य रिपोर्दुदः।।'''</blockquote><blockquote>'''उभाभ्यामथ हस्ताभ्यां कुर्यात्तस्य निपातनम्। अक्लेशेन हि तत् कुर्वन वधे सिद्धिमवाप्तुयात्॥'''</blockquote>अर्थ- उजव्या हातात नवी दणकट काठी घेऊन तो वर उचलून शत्रूला मारावी म्हणजे त्याचा घात होतो. दोन्ही हातानी त्याला खाली पाडावे सहजतेने हे करणारा शत्रूचा वध करण्याच्या बाबतीत सिद्धी प्राप्त करून घेतो बहुकामी व सहज उपलब्ध होणारी असली तरी ती चालविण्याचा नियमित सराव होणे गरजेचे असते जेणेकरून योग्यवेळी तिचा उपयोग करता येऊ शकतो. |